मेरा कुछ सामान ...
आभाळात चंद्र,
क्षितिजावर लाली,
फुलांच्यात गुलाब
आणि ॠतुंमध्ये वसंत
खरच इतका महत्वाचा असतो का..
की त्यांच्याशिवाय बाकी सगळंच बिनमहत्वाचं ठरावं?
तशी जगत होतेच की मी माझी पोकळी घेवुन..
मग कोणत्या एका क्षणी हसता हसता डोळे भरुन आले..
सुर्यास्त पहाताना माझ्या नजरेतल्या भावनांचं प्रतिबिंब
तुझ्या नजरेत मला दिसलं..
आणि तुझ्या माझ्याही नकळत त्या मनातल्या पोकळीचे दरवाजे
उघडले मी तुझ्यासाठी...
तुला डोकावु दिलं माझ्या खोल आत..
आणि तसंच सामावुनही घेतलं त्यात..
खरं सांगु का,
तू येण्याआधी ती पोकळी इतकी भयानक खरच नव्हती..
उलट तीच मला सोबत करत होती..
तिच्या भरुन रिकामं होण्याने,
ते रिकामपण जास्तच जाणवायला लागलय..
आता मुद्दाम पहावं लागतं,
स्वतःला जाणिव करुन द्यावी लागते की,
चंद्राशिवाय पण आभाळ आहे..
क्षितिजावर अजुनही रंग आहेत..
इतरही फुलं आहेत..
इतरही ऋतू आहेत..
पण आधीच्या स्वाभाविक गोष्टी
आता समजुत घातल्यासारख्या वाटतात..
मला या पोकळीची जाणिव झाली
यात काही चूक झाली का...
तुला माझ्यात डोकावु देणं
ही खरच चूक होती.. (?)
0 Responses